घरठाणेमुंबईकरांना सुविधा न देता केवळ त्या सत्तेचा उपयोग आपली घरे भरण्यासाठीच

मुंबईकरांना सुविधा न देता केवळ त्या सत्तेचा उपयोग आपली घरे भरण्यासाठीच

Subscribe

मुख्यमंत्र्यांची ठाकरे पितापुत्रांवर टीका, केक कापून केला वर्षपूर्तीचा जल्लोष साजरा

गेली २० ते २५ वर्षे मुंबईत सत्ता कोणाची होती, हे सर्वांनाच माहित आहे. त्यांनी मुंबईकरांना सुविधा न देता केवळ त्या सत्तेचा उपयोग आपले घर भरण्यासाठी केला. तर कोवीडमध्ये माणसे मरत असतांना ते कोवीडच्या नावाखाली लुट सुरू केली होती. त्यातच त्यांनी कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप करून भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला.दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोलायचे अशा प्रकारच्या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतीलच. शिवाय मुंबईकराच्या डोळ्यात धुळ फेकता येणार नाही, तुम्ही जे काही क्रेडिट घेतले त्याचे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.
दरम्यान हा मोर्चा केवळ स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठीच काढणार असल्याचा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात केला.

तसेच याप्रसंगी लहान मुले, सफाई कामगार, पोलीस यांच्या समवेत केक कापून वर्षपुर्तीचा आनंद जोरदार साजरा केला.
शिवसेना आणि भाजप युती सरकारची वर्षपुर्ती झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थितीत जनतेशी संवाद साधला, यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पितापुत्रांना प्रामुख्याने लक्ष केले. तर ,२०१९ शिवसेना – भाजप युती घोषीत त्यानंतर सत्तेत युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. कोवीडच्या नावाखाली फडणवीसांच्या योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले गेले. मुख्यमंत्री आपला असतांनाही सरकार कोण चालवित होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी भलतच धाडस करावे लागले, ते सोपे नव्हते. परंतु महाराष्टÑाच्या जनतेत, शिवसेनेच्या आमदारांमध्ये जे काही घडत होते, उद्रेक होता,त्याला वाचा फोडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यातून हे सरकार स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अजितदादा मनातून बोलत नाही
शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहाटेच्या शप्पथविधी ची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून शरद पवार म्हणाले मी गुगली टाकली आणि देवेंद्र फडणवीस यांना क्लीन बोल्ड केले. पण या खेळीत खरी विकेट अजित पवार यांचीच गेली असल्याचा टोला लगावला. त्यातच विरोधीपक्ष नेते अजित पवार हे मनातून बोलत नाहीत. तर, त्यांना बोलावे लागत असल्याचे शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -