- Advertisement -
महाराष्ट्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी नसल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता यावर तोडगा निघाला असून, उद्धव ठाकरे हे आता राज्यपाल नियुक्त आमदार होणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व आमदारांच्या पगारांमध्ये कपात केली आहे. ३० टक्क्यांनी ही कपात लागू करण्यात आली असून एप्रिल २०२० ते एप्रि २०२१ अशी संपूर्ण एक वर्षासाठी ही कपात लागू असेल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
- Advertisement -