- Advertisement -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी पाहणी दौरा केला का याची आठवण ठेवावी, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हाणला आहे. सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत. आता पंचनामे लवकर होतायेत, नुकसानभरपाई दुप्पट मिळते. हे पूर्वी का होऊ शकलं नाही, अशी खोचक टीका देखील दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
- Advertisement -