- Advertisement -
उत्तर प्रदेशमध्ये आम्ही निवडणूका लढवत आहोत.मात्र आमच्या सात ऊमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशिरपणे रद्द केलं. कागदपत्र योग्य दिले, सत्तेचा दुरूपयोग केलाय आमच्याकडे पुरावे आहेत, ते तीनच्या आधी तिथे पोहोचले होते, तरी देखील त्यांचे नामांकन रद्द केलं डीएम ऐकत नाही, दबावात काम करत आहेत, ते शिवसेनेला घाबरले आहेत. हे लोकतंत्र नाहीये. आम्ही याबद्दल आवाज ऊठवणार असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच सामना या मुखपत्रातील अग्रलेखावर देखील त्यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.
- Advertisement -