- Advertisement -
वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसं झालं नसतं तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असा दावा श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज, शुक्रवारी केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा नेते किरिट सोमय्यासुद्धा उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
- Advertisement -