- Advertisement -
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. ओल्या दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागातून मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परिक्षा शुल्क आमि वसतीगृह शुल्क माफ करावे, या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई विद्यापीठाबाहेर उपोषणासाठी बसले आहेत. याचा आढावा घेतला आहे माय महानगरच्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी…
- Advertisement -