- Advertisement -
केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले बरेच दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी संघटनांच्या ६ वेळा बैठका पार पडल्या. मात्र, या बैठकांमधून काहीच निष्पन्न झालं नाही. शेतकरी आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि काही शेतकरी संघटनांमधील वाद मिटविण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश दिले.
- Advertisement -