- Advertisement -
अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमा भागात भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे देण्यात आले होते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
- Advertisement -