भाजपावर नाराज असलेल्या स्वाभिमान पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांना काँग्रेस आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना बरोबर घेण्यासाठी आता भाजपाचे प्रयत्न सुरू केले आहेत. राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासाठी भाजपाने राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस पेक्षा नैसर्गिक मित्र बरा असा सूर भाजपाकडून लावल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजू शेट्टी पुन्हा भाजपाशी हात मिळवणी करणार हे पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी ‘बॅट’ हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी भाजपाची बॅटिंग करतात की काँग्रेसची हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.