तामिळानाडूतील मदुराई जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली असून मोठा स्फोट झाला आहे. तसेच या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 10 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
मदुराई एसपींनी पाच जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मदुराई जिल्ह्यातील उसिलामबत्ती भागाजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं एसपींनी सांगितलं.
हेही वाचा : मुंबईत ’26/11’च्या पुनरावृत्तीची शक्यता, सुरक्षा यंत्रणा तैनात