घरदेश-विदेशगृहमंत्र्यांचे आदेश! जम्मू काश्मिरमधील निमलष्कर दलातील १०० कंपन्यांना माघारी बोलावले

गृहमंत्र्यांचे आदेश! जम्मू काश्मिरमधील निमलष्कर दलातील १०० कंपन्यांना माघारी बोलावले

Subscribe

केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून निमलष्करी दलाच्या १०० कंपन्यांना म्हणजे १० हजार जवानांना माघारी बोलावण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. या १०० कंपन्यांमधील सीआरपीएफच्या ४०, बीएसएफच्या २० आणि सीआयएसएपच्या २० कंपन्या केंद्रशासित प्रदेशात तैनात होत्या. त्यांना आता माघारी बोलवण्यात आले आहे.

- Advertisement -

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एकूण १०० तुकड्यांना जम्मू काश्मीरमधून तात्काळ माघारी येण्याचा आदेश देण्यात आला आहे. या तुकड्यांना आपल्या तळावर परतण्यास सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर या जवानांना तैनात कऱण्यात आले होते. मात्र आता गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीम बळाच्या प्रत्येकी २० तुकड्या या आठवड्याअखेर जम्मू काश्मीरमधून हटवल्या जातील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एका तुकडीत १०० जवान असतात.

हेही वाचा –

Instagram मध्ये QR code चं नवं फीचर! असा तयार करा तुमचा QR code

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -