राजस्थानमधील जोधपूरमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व जण पाकिस्तानी शरणार्थी असल्याचे समजते. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्राथमिकदृष्ट्या विषारी वायूमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना देचू पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले. मृतांमध्ये ६ वयस्कर व्यक्तींसह पाच मुलांचा समावेश आहे.
मृत्यू झालेले सर्व पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात दाखल झाले होते. हे सर्व अचलावता नावाच्या गावात शेतीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. घटना घडली त्यावेळी या कुटुंबातील एक बहिण रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी उपस्थित झाली होती. त्यामुळे घरात एकूण १२ सदस्य होते. त्यातील एक सदस्य रात्री झोपण्यासाठी शेतात गेला होता. सकाळी येऊन पाहिले तेव्हा त्याला संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले.
हेही वाचा –
‘मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख, सरकार काय करतंय’; पवारांचा राऊतांना फोन