घरताज्या घडामोडी१५ ऑगस्टनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होणार

१५ ऑगस्टनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होणार

Subscribe

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घोषणा

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर देशातील शाळा, महाविद्यालये सुरू होतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील. शक्यतो १५ ऑगस्ट २०२० नंतर देशातील शैक्षणिक संस्था सुरू होतील.

- Advertisement -

१५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही निशंक यांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यासंदर्भात रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहिले होते. आपल्याला करोनासोबत जगावे लागेल, हे मान्य करून देशातील शाळांची भूमिका नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे. तसेच शाळांना याबाबत साहसी भूमिका घेण्यास तयार करण्यात आले नाही तर ती आपली ऐतिहासिक चूक ठरेल. शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंतच मर्यादित नाही. तर मुलांना एक जबाबदार जीवन जगण्यासाठी तयार करण्याची आहे, असे सिसोदिया यांनी या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -