दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या म्हणण्यानुसार कोरोनावायरस हा माणसांने आत्तापर्यंत केलेल्या गुन्हांमुळे भारतात आला आहे. त्यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. तो व्हीडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, “एक नेक इंसान होकर जिंदगी को जियो, मालिक अपनी हर नेमत से झोली भर देगा आपकी।”
ऐक नेक इंसान होकर जिंदगी को जीयो,
मालिक अपनी हर नीमत से झोली भर देगा आपकी pic.twitter.com/sF33K2UHEp— Dharmendra Deol (@aapkadharam) April 11, 2020
व्हीडिओमध्ये ८३ साल धर्मेंद्र म्हणाले, आज माणूस त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. कोरोना हा आपल्या कर्माची फळं आहेत. जर माणूस माणसाबरोबर प्रेमाने वागला असता, माणुसकीला धरून वागला असता ना तर आज आपल्यावप ही वेळ आली नसती. आपण यातून शिकूयात यापुढे सगळे एकत्र राहूयात. माणूसकीला धरून राहूयात.
यापुढे धर्मेंद्र इमोशनल होऊन म्हणाले, मी खूप दुखी होऊन तुम्हाला सांगतोय की, देवासाठी, स्वत:साठी, लहान मुलांसाठी, या जगासाठी आपण एकत्र होऊयात.
धर्मेंद्र यांच्या या व्हीडिओवर अनेकांनी साकारात्मक प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांना धर्मेंद्र यांच म्हणणं पटलं आहे.