घरमनोरंजन'या' कारणामुळे परिणीती-राघव यांनी हनिमून केले पोस्टपोन

‘या’ कारणामुळे परिणीती-राघव यांनी हनिमून केले पोस्टपोन

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 24 सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. पंजाबी पद्धतीने राजस्थानमधील उदयपूर येथे नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या हनिमूनबाबत बातमी समोर आली आहे.

परिणीती-राघवचा हनिमून रद्द

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणीती आणि राघव हनिमूनला कुठे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या जोडीने आपला हनिमून काही कारणास्तव रद्द केलेला आहे. कारण परिणीतीला तिच्या नवीन कुटुंबासोबत काही दिवस वेळ घालवायचा आहे तसेच तिला पुन्हा शूटिंगवर परतायचे आहे. तसेच राघवही त्याच्या कामामुळे खूप व्यस्त आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संसदेत बरेच काम आहे. अशा परिस्थितीत या दोघांनी आपला हनिमून पुढे ढकलला आहे.

- Advertisement -

परिणीती-राघवचे मुंबईत ग्रँड रिसेप्शन

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे, हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, या लग्नात एकही बॉलिवूड कलाकार उपस्थित नव्हता. त्यामुळे येत्या 4 तारखेला बॉलिवूड कलकारांसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी असणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अग्निपंख, वास्तव, हॅम्लेट आणि नटसम्राट ह्या मराठी रंगभूमीवरील सर्वोत्तम परंपरांचा आनंद लुटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -