भूक न लागण्याचे अनेक कारणे असतात. सर्वांबरोबर भूक न लागणे हा प्रकार कधी ना कधी होतो. हे काही दिवसांसाठी ठीक आहे. पण जर भूक न लागणे सतत होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. शारिरीक आणि मानसिक कारणामुळे देखील भूकेवर परिणाम होतो. त्यामुळे अशक्तपणा येतो. म्हणून आज तुम्हाला भूक वाढण्यासाठी काय करायचे हे सांगणार आहोत.
१) रोज जेवण करण्याआधी आल्याला सैंधम मीठ लावून खाणे, त्यामुळे भूक लागते.
२) हिरडा, गूळ, सुंठ, यांचे चुर्ण करून ते मठ्ठ्याबरोबर घ्यावे.
३) सफरचंद हे भूक वाढवते त्यांमुळे दररोज एक तरी सफरचंद खाणे. तसेच सफरचंद खाल्ल्याने रक्क शुद्ध होते.
४) काळ्या मीठाचे सेवन करावे त्यामुळे गॅसेसची समस्या कमी होते. पोटही साफ होते आणि भूक लागते.
५) गरम पाण्यात सुंठीचे चूर्ण तूपात मिसळून प्यायल्यास चांगली भूक लागते.
६) गूळ, मीठ, सुंठ, हिरड्याचे चूर्ण एकत्र घेतल्यानेही ही समस्या दूर होते.
७) कडूलिंबासोबत हिरडा खाल्याने भूक वाढते आणि त्वचा रोग होत नाही.