भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेत गोंधळ आणि गैरवर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा कामकाजाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणावर आज सुनावणी होणार असून सर्वांचेच लक्ष न्यायालयाच्या निर्णयावर लागले आहे.
राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ आमदारांना गैरवर्तन केल्यामुळे १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. शिवसेना आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव कामकाज पाहत असताना ओबीसी आरक्षणावरुन भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली आणि नंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये धक्काबुक्की केली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. विधानसभेत एकमताने त्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
भाजपच्या १२ आमदारांनी कोर्टात धाव घेतली होती. काही दिवसांवर राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनापुर्वी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या सुनावणीत भाजप आमदारांना दिलासा मिळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आशिष शेलार दिल्लीत दाखल
भाजप आमदार आशिष शेलार यांचाही त्या १२ आमदारांमध्ये समावेश आहे. आशिष शेलार दिल्लीत याचिकेवरील सुनावणीसाठी उपस्थित राहिले असल्याचे सांगितले जात आहे.
या आमदारांवर निलंबनाची कारवाई
पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा : भाजपाचे खासदार शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेत, शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला