राज्यातील महाविकास आघाडीच्या गोटात काहीतरी शिजत असल्याचे दिसतं आहे. मागील काहीदिवसांपासून महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये काहीतरी शिजत असल्याचा संशय राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतल्यामुळे अधिक चर्चा होत आहे. महाविकासमध्येच कुरघोड्या होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी या राजकीय भेटीगाठींवरून केला आहे. तुम्ही एकमेकांविरोधात खुशाल कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरु नका अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, यावेळी महाविकास आघाडीत सुरु असलेल्या नाटकीय भेटीगाठींवर परखड टीका केली आहे. शेलार यांनी म्हटलं आहे की, खरं तर तीन पक्ष मिळून एकमेकांशी काय कुरघोड्या करत आहेत याच रोज सर्वसामान्यांपुढे प्रदर्शन आहे. ३ पक्ष मिळून एकमेकांविरोधात कुरघोड्या करुदेत त्याच्यावर काही म्हणणं नाही. जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि बिमोड करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आज सामान्यांचा रोजगार बुडतो आहे. रोजगारवर, व्यावसायासाठी जाताना अडवण्यात येत आहे. या सगळ्यातन जी कुचंबना सामान्य माणसाला स्वतःच घर परिवार चालवण्याची आहे. त्यातून कुठेतरी सुटका होऊ पाहताना यांच्या कुरघोड्या सुरु आहेत.
तीन पक्षांनी खुशाल एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या कराव्यात जनतेला वेठीस का धरताय? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/KhmZMRNn49
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 29, 2021
हे तीन पक्ष आपापसांत भांडत आहेत का तर त्याचे उत्तर हो, तीन पक्ष आपसांत भांडत आहेत का तर तेही चित्र आहे. त्यामुळे सुनियोजित अशा पद्धतीचे राज्य चालले नाही. हे सरकार जनतेला त्रास देणारं आहे यामुळे जनता कधीही माफ करणार नाही असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेलं
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडीमध्ये किती अलबेलं आहे हे येरझऱ्यांवरुन दिसतंय असा टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं, एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय? संजय राऊत यांना माझंआवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं
एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय?संजयजी माझंआवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं pic.twitter.com/fsP0R2WmAy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 29, 2021