मुंबई- राज्यात १,७१५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९१,६९७ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८, ६३१ इतकी झाली आहे. राज्यात रविवारी २९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,३९,७८९ वर पोहोचली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात रविवारी २,६८० रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७ (१०.८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.