घरमहाराष्ट्रराज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक कार्यक्रमाला जातील, दुसरे मंत्रालयात; सुप्रिया सुळेंची उपहासात्मक...

राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक कार्यक्रमाला जातील, दुसरे मंत्रालयात; सुप्रिया सुळेंची उपहासात्मक टीका

Subscribe

मुंबई – आपल्या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील, असा निरोप आम्हाला कोणीतरी व्हॉट्सअॅप वर पाठवला आहे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता गणपती आहेत. त्यानंतरअनेक सण आणि काहीना काही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी व्हॉट्सअॅप वर पाठवला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

त्या पुढे म्हणाल्या की, सध्या ओरबाडून, दडपशाही करून चुकीच्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे. गेले १५ दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय. पण मला अजूनही वेळ मिळालेला नाही. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळतं. हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्ह्यात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -