नागपुरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी नागपुरच्या कन्हान येथील वेकोली कोळसा खाण येथे घडली आहे. दुपारी मातीच्या ढिगाऱ्यावर मजूर बसले होते. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर बसलेले मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
परिसरात अवैध कोळसा खाणी
कन्हान भागात बऱ्याच अवैध कोळसा खाणी आहेत. इथे काही लोक जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती उपसून कोळसा शोधण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व उद्योग अवैधपणे सुरु आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे आणि अवैध खाणींमुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. या दोन्ही कारणांमुळे मजुरांचा बळी गेला आहे.
- Advertisement -
हेही वाचा – चेन्नईत जलसंकट; अखेर चेन्नईकरांची आज भागणार तहान