घरमुंबईआदित्य, अमितने निवडणूक लढवली तर गैर काय?

आदित्य, अमितने निवडणूक लढवली तर गैर काय?

Subscribe

राज ठाकरे यांचा सवाल

आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? आदित्य मला मुलासारखा आहे. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही आपले म्हणणे उद्धव आणि माझ्यावर लादले नाही. जर असे संस्कार आमच्यावर झाले असतील आणि मुलांना आता निवडणूक लढवावेसे वाटत असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी. त्यात गैर काय?’, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

- Advertisement -

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवार निवडणुकीसाठी उभा केलेला नाही. आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातला पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांचा विधानसभेपर्यंतचा प्रवास अधिकाधिक सोपा कसा होईल, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मनसेनेही या मतदारसंघातून आपला उमेदवार दिलेला नाही.

गेल्या 5 ते 10 वर्षांत सरकारला विरोधी पक्ष आम्हीच रस्त्यावर उतरून विरोध केला होता. त्यामुळे आमच्यावर इतक्या केसेस पडल्या आहेत? त्यामुळे आम्हाला विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करायचा आहे. माझ्याकडे पर्याय नव्हता असं नाही, मी निवडणूक लढविली नसती, देशाची स्थिती, राज्याची स्थिती आर्थिक डबघाईला आली आहे. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका घेणे हे हिंमतीचे आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार आणि आमच्यात कधीही एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, असे ठरले नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी राजकीय विरोधक असतील तर एकमेकांबद्दल वैयक्तिक विरोध कधीच नसतो. भाजप खासदार शरद पवारांच्या घरी येतात म्हणून असे नाही बोलू शकत की भाजप राष्ट्रवादीसोबत जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -