घरमुंबईआचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

Subscribe

बेहिशोबी 15 लाख 60 हजारांची रोकड ताब्यात

उल्हासनगरातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्या कडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकड ताब्यात घेतली. याप्रकरणी उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रोकड ताब्यात घेण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा निवडणूक 29 एप्रिल रोजी असून त्यात बेहिशोबी रोकड वाहनात बाळगणार्‍या आसमींवर वॉच ठेवण्याचे तसेच अशा संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी नोडल अधिकारी युवराज भदाणे तसेच आचारसंहिता प्रमुखांना दिलेले आहेत. गिरासे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना शनीवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असणारे उल्हासनगर पालिकेच्या आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे, आचारसंहिता पथक प्रमुख संजय पवार यांनी म्हारळ नाक्यावर अलब्रत नाडर यांची कार थांबवून पोलीस उपनिरीक्षक बी.बी.चव्हाण यांच्या समक्ष कारची झाडाझडती घेतली असता त्यात साडेसहा लाख रुपयांची बेहिशोबी रोकड मिळाली. नाडर हे व्यावसायिक असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्याकडे तसा पुरावा सापडला नाही.

- Advertisement -

पुन्हा शनिवारीच रात्री 11 वाजण्याच्या भदाणे, विजय बेहनवाल यांनी कॅम्प नंबर 3 मध्ये साईबाबा मंदिरा जवळ वाईन शॉप असणारे व्यापारी रवी रायसिंघानी यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 5 लाख रुपयांची बेहिशोबी रोकड मिळून आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भदाणे, राजू निकाळजे यांनी म्हारळ जवळ जुन्नर पुणे येथून येणारे राहुल आहुजा यांच्या वाहनात 4 लाख 10 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड हस्तगत केली आहे.आहुजा हे व्यापारी आहेत. ते विठ्ठलवाडी येथे माल खरेदी करण्यासाठी आलो होतो असे ते सांगत आहेत. मात्र तिन्ही व्यापार्‍यांकडे बँकेचे स्टेटमेंट नसून त्यांचे उत्तर असमाधानकारक आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्तीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर करत आहेत. दरम्यान अवघ्या 17 तासात आचारसंहिता पथकाने तिघांकडून बेहिशोबी रोकड ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -