गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेतली. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील जांभरखेडा येथे पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. भूसुरुंगाचा स्फोट करुन पोलिसांना दोन गाड्या उडवून दिल्या. हा हल्ला भ्याड हल्ला असून हे कुरखेडा पोलिसांचे पथक होते. या हल्ल्यात १५ पोलीस शहीद झाले आहेत. तर एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलीस खासगी वाहनांनी प्रवास करत होते. ते खासगी वाहनाने का प्रवास करत होते याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली आहे.
Subodh Jaiswal, DGP Maharashtra: We are prepared to give a befitting reply to this attack (Gadchiroli Naxal attack); Operations are going on in the area to ensure that no further casualties take place. pic.twitter.com/wZeKfEzAh2
— ANI (@ANI) May 1, 2019
दरम्यान, पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम घटनास्थळी जाणार आहोत. निवडणूक काळामध्ये हल्ला केल्यामुळे नक्षलवाद्यांनी निवडणूकीला लक्ष्य करत हा हल्ला केले जात असल्याचे बोलले जात होते. मात्र या हल्ल्याचा निवडणूकीशी संबंध जोडणे चूकीचे असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. हल्ला केलेल्या नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत नक्षलवाद्यांचे आव्हान मोडून काढू, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली आहे.
Subodh Jaiswal, DGP Maharashtra: It would not be right to term this as an intelligence failure. It is a dastardly attack, we will try our best that such incidents are not repeated. Our people are present at the spot, more information will come out by today evening. https://t.co/Mp2Yt1TsW7
— ANI (@ANI) May 1, 2019
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत मागवण्यात आली आहे. संपूर्ण जंगलाचा अभ्यास करुन मग कारवाई केली जाणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांना उत्तर देणार आहोत. तसंच आमची टीम गडचिरोलीकडे रवाना झाली असून ती त्याठिकाणीची माहिती घेऊन पुढची पाऊलं उचलली जाणार आहेत.