वांद्र्यातील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. कालच या विषयावर विधानपरिषदेत जोरदार चर्चा झाली. नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीतील आगीच्या घटनेचे सर्वेक्षण करणार असल्याचे सरकारने सांगितले असतानाच आता पुन्हा एकदा वांद्र्यातील शास्त्री नगर झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल, पाण्याचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अद्याप या आगीत कुणी जखमी आहे का? याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हे वाचा – नर्गिस दत्त नगरमध्ये दहा वर्षात ४९ हजार वेळा लागली आग