घरमुंबईठाणे : 'स्वच्छ भारत' अभियानाला बेवारस वाहनांचा अडथळा

ठाणे : ‘स्वच्छ भारत’ अभियानाला बेवारस वाहनांचा अडथळा

Subscribe

ठाणे महानगर पालिकेला अनेक पुरस्कार मिळवल्यानंतर आता ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ मध्ये ठाणे मुंबई महानगरपालिकेने उत्तीर्ण होण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात विविध ठिकाणी स्वच्छता सुरू असून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मात्र स्वच्छ भारत अभियानासमोर बेवारस भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य आणि अंतर्गत रोडवर तसेच पार्किंगमध्ये शेकडो भंगार वाहने धूळ खात पडली आहेत. या मोहिमेत नागरिकांसाठी सूचना करण्याचे आवाहन आणि संकेत स्थळ प्रसिद्ध करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माहितीही पुरविली. मात्र मोहीमच थंडावल्याने गाड्या बेवारस पडलेल्या दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्याच्या रस्ता रुंदीकरणात मोकळे केलेले रस्ते आज पार्किंग आणि भंगार गाड्यांनी व्यापलेले आहेत. याचा वाहतुकीला मोठा अडथळा होतो. मात्र कारवाई करणार कोण? असा यक्ष प्रश्न नागरिक आणि तक्रारदारांसमोर उभा आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे रोड क्रमांक १६, ३३, २२ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेवारस गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असल्याचे चित्र आहे. याच दुतर्फा वाहनाच्या घुसमटीतुन वाट काढीत रस्त्यावरील वाहतूक होत आहे. याचा वाहनचालक, बसचालक आणि रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांना नाहक सहन करावा लागतो आहे. प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देईल काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने उभी आहेत. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणसाठी अडथळा निर्माण होत असून शहर विद्रुप होत आहे. वाहने दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी वाहतूक विभागाची असून वाहतूक विभागाने आराखडा तयार करवा. महापालिका हवा तो मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री देण्यास तयार आहे.
-शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -