मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. याध्ये महाराष्ट्र राज्य ऊर्जा कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ए शैला यांची व्यवस्थापकीय संचालक हाफकीन मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर याठिकाणी नियुक्ती झालेले कुणाल खेमनार यांच्या आदेशात काहिसा बदल करुन त्यांना पुणे मनपा येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.
दरम्यान, विलास पाटील उर्वरित महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य सचिव पदावरुण सचिव अन्न व पुरवठा विभाग तर कौस्तुभ दिवेगावकर संचालक भूजल सर्वेक्षण यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापुर्वी देखील ठाणे महानगरपालिकेतील आयुक्त विजय सिंगल, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आयुक्त चंद्रकांत डांगे, नवी मुंबई महानगरपालिकेतील आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे या सर्व अधिकाऱ्याची एकाच दिवसात बदली करण्यात आली होती, त्यांच्या जागी नवीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमण्यात आले असून ठाण्यात बिपिन शर्मा, मीरा भाईंदर येथे डॉ विजय राठोड, नवी मुंबई येथे अभिजीत बांगर आणि उल्हासनगर येथे राज दयानिधी या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यादरम्यान या बदल्या चुकीच्या असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्याचे समोर आले होते.