घरमुंबईउद्योजक घडवण्यासाठी आयआयटीचा पुढाकार

उद्योजक घडवण्यासाठी आयआयटीचा पुढाकार

Subscribe

आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात येते. यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम नोकर्‍या मिळतात. पण आयआयटीने आता विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून आयआयटीने विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे कोर्सेस आणि बाजारपेठा उपलब्ध करून देण्याबरोबरच संशोधनासाठी विविध कंपन्यांबरोबरच सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. त्यांच्यातील हुशारी व गुण पारखून अनेक देशी, विदेशी कंपन्यांना त्यांना रग्गड पगाराच्या नोकर्‍या देतात. आयआयटी मुंबईतील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळत असल्या तरी आता उद्योजक घडवण्याकडे लक्ष देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे. उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक परवानग्या व आर्थिक पाठबळ उभे करणे, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

त्यामुळे आयआयटी मुंबईने त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये आयआयटी मुंबईतून शिक्षण घेऊन बाहेर पडून यशस्वी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व विविध छोटे कोर्सेस चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशीविदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

माजी विद्यार्थ्यांबरोबरच आयआयटी मुंबईकडून विविध कंपन्यांसोबत सांमजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराच्या माध्यमातून संशोधनावर अधिक भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा यासाठी या मोहिमेत भर देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईचे नवनियुक्त संचालक प्रो. सुभासिस चौधरी यांनी सांगितले. चौधरी यांनी आयआयटी मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयआयटी मुंबईतील अ‍ॅकेडमी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्रो. ए.के. सुरेश व फायनान्स अ‍ॅण्ड एक्स्टर्नल अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्रो. पी.एम. मुजुमदार उपस्थित होते.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देणार वाव
अनेक विद्यार्थी हे आई-वडिलांच्या दबावामुळे इंजिनियर होण्यासाठी आयआयटीमध्ये प्रवेश घेतात. पण प्रत्यक्षात त्यांना इंजिनियरींगमध्ये काहीच रस नसतो. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईने अशा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील अन्य गुणांना चालना देण्यासाठी लिब्ररल स्टेम ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 2020 मध्ये आयआयटीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -