घरमुंबईभारतीयांना विमानाची लागली हवा; प्रवाशांच्या संख्येत वाढ

भारतीयांना विमानाची लागली हवा; प्रवाशांच्या संख्येत वाढ

Subscribe

विमान उड्डाण रद्द होण्याच्या परिणाम हवाई प्रवाशांवर झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.१८ टक्क्यांनी प्रवाशांची संख्या वाढली.

यंदा देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ च्या कालावधीत हवाई प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये देशांतर्गत विमान करणारे प्रवाशी हे १ कोटी १३ लाख ९८ हजार होते. तर यंदा १ कोटी १५ लाख ३३ हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यातील प्रवाशांची संख्या ही १.१८ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण हे १.३७ टक्के होते. एअर डेक्कनची सर्वात जास्त उड्डाणे रद्द झाली होती. विमानातील तांत्रिक बिघाड हे उड्डाण रद्द होण्याचे प्रमुख कारण होते. तसंच २७.३ टक्के उड्डाणेही खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र याचा काही परिणाम हा हवाई प्रवाशांवर झाला नाही.

तरी देखील तज्ज्ञांचा प्रवाशांची संख्या कमी झाल्याचा दावा

स्पाइसजेटने प्रवासी भारमानामध्ये ९३ टक्के प्रवासी संख्येसह प्रथम स्थान पटकावले आहे. तर गोएअर ८६.७ टक्के इतकी प्रवासी संख्या होती आणि इंडिगोची ८६.५ टक्के होती. ऑगस्ट महिन्यात एअर इंडियाची प्रवासी संख्याही ८०.९ टक्क्यांवरून घटून ७९ टक्के झाली. पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून असा दावा करण्यात आला आहे की, पर्यटनाचा हंगाम संपल्याने प्रवाशांच्या संख्येत कमी प्रमाणात वाढ झाली आहे.

- Advertisement -

यंदाच्या वर्षातील प्रवाशांच्या संख्यांची टक्केवारी

महिना                        प्रवाशी संख्यांची टक्केवारी
जानेवारी                       ९.१ टक्के
फेब्रुवारी                       ५.६२ टक्के
मार्च                           ०.१४ टक्क्यांनी कमी
एप्रिल                          ४.५ टक्क्यांनी कमी
मे                              २.७९ टक्के
जून                            ६.१९ टक्के
जुलै                           ३.१ टक्के
ऑगस्ट                        ३.८७ टक्के
सप्टेंबर                         १.१८ टक्क्यांनी वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -