घरमुंबईमुंबईत तब्बल दोन हजारहून जास्त इमारत दुर्घटना तर २३४ जण बळी

मुंबईत तब्बल दोन हजारहून जास्त इमारत दुर्घटना तर २३४ जण बळी

Subscribe

२०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी मागील  साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांची बळी तर ८४० जख्मी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला २०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन २०१३ पासून जुलै २०१८ पर्यंत एकूण मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांची बळी ८४० जख्मी झाला आहे.

ही आहे आकडेवारी

२०१३ मध्ये एकूण ५३१ कोसळण्याची दुर्घटनेत एकूण १०१ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १८३ लोक जखमी झाले असून त्यात ११० पुरुष आणि ७३ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१४ मध्ये एकूण ३४३ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण २१ लोकांची मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ६२ पुरुष आणि ३८ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१५ मध्ये एकूण ४१७ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण १५ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ११ पुरुष आणि ४ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १२० लोक जखमी झाले असून त्यात ७९ पुरुष आणि ४१ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१६ मध्ये एकूण ४८६ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण २४ लोकांची मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ७ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १७१ लोक जखमी झाले असून त्यात ११३ पुरुष आणि ५९ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१७ मध्ये एकूण ५६८ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण ६६ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ४४ पुरुष आणि २२ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १६५ लोक जखमी झाले असून त्यात १०१ पुरुष आणि ६४ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१८ जुलै पर्यंत एकूण ३५९ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण ७ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ५ पुरुष आणि २ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ७३ पुरुष आणि २७ स्त्रियांचे समावेश आहे.

- Advertisement -

विशेष व्यवस्था करण्याची मागणी

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते गेल्या पाच वर्षांत जितके लोकांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाली नसून, त्यापेक्षा जास्त मृत्यु इमारती कोसळून झाली आहे. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटनेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -