मुंबईत सामुहिक आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शकील जलील खान ( वय, 34 ), राबिया शकील खान ( 25), सरफराज शकील खान (07) आणि अतिफा खान (वय तीन वर्षे) अशी मृत व्यक्तींची नाव आहेत.
पती शकील खान यांच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला असून तिघांचे मृतदेह घरात आढळून आलेत. पतीने पत्नी आणि मुलांना विष देऊन मग स्वत: आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
Mumbai | Bodies of four persons of the same family including two children found in a house in the Baiganwadi area of Shivaji Nagar, say police.
— ANI (@ANI) July 29, 2022
पोलिसांच्या माहितीनुसार, हे चारही मृतदेह एका खोलीत आढळून आलेत. या घटनेदरम्यान खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावली होती. यातील शकील खान यांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत होता. तसेच इतर तिघांचे मृतदेह एकमेकांच्या बाजूला होते. ही सामुहिर आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
मात्र एकाच घरातील चार जणांच्या मृत्य मागे नेमक काय कारण आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान घटनास्थळावरून काही नोट मिळतेय का? किंवा पुरावे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. तसेच मृत कुटुंबियांच्या शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.
अंधेरीच्या चित्रकूट मैदानाजवळ भीषण आग