राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. मात्र अद्याप सत्तास्थापना झालेली नाही. भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या प्रमुख पक्षांमध्ये सत्तेतील वाट्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. असे असताना दुसरीकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु असताना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपले मत मांडले आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे , उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो !
महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 3, 2019
काय म्हणाले सत्यजित तांबे?
सत्यजित तांबे म्हणाले की, “सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो!” सत्यजित तांबे यांचे मत किती खरे ठरणार हे येणारा काळच ठरवेल.