महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील मंडळींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव यांनीही या दोघांच्याही ट्वीटला प्रतिसाद देत त्यांचे आभार मानलेही आहेत.
Heartfelt gratitude for the birthday wishes extended by you, @narendramodi ji. I am confident that your guidance and support will help Maharashtra further step up its contribution to national prosperity in the coming years🙏🏼 https://t.co/LzpN6BoNTb
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 27, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘आपल्या निरोगी दीर्घायुष्य लाभो’ असे ट्विट केले तर या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री उद्धव यांनी नेरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘आपले मार्गदर्शन आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. याच्या जोरावर पुढील काळात महाराष्ट्र देशाच्या विकासात अधिकाधिक योगदान देत राहील, असा विश्वास उद्धव यांनी मोदींच्या ट्विटला उत्तर देताना व्यक्त केला आहे.
…आणि अजित’दादां’नी या फोटोसह दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा!
तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच, राज्यातील कोरोनाच्या सध्य परिस्थितीची आढावाही घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले आहेत.
In a telephonic call, President Kovind wished Shri Uddhav Thackeray, Chief Minister, Maharashtra on his birthday. President also enquired about COVID-19 situation in the state & complimented the state's frontline corona-warriors for their tireless efforts in tackling the pandemic
— President of India (@rashtrapatibhvn) July 27, 2020
दरम्यान, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिवसैनिक व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालय किंवा मातोश्री निवासस्थानी येऊ नये. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन उद्धव यांनी केलं आहे.