घरपालघरअप्रकाशित नाटकांमागचा इतिहास उलगडणारा दस्तऐवज

अप्रकाशित नाटकांमागचा इतिहास उलगडणारा दस्तऐवज

Subscribe

वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, प्रदीप कबरे, डॉ. सुनिता चव्हाण, प्रमोद पवार, व्यंकटेश नायडू, अशोक मुळे यावेळी उपस्थित होते.

वसईः नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या ’ गांजले ते गाजले ’ हे पुस्तक म्हणजे गवाणकर यांच्या प्रकाशित – अप्रकाशित नाटकांमागचा इतिहास उलगडणारा हा मिश्किल भाषेतील दस्ताऐवज आहे. अशोक भाईडकर यांनी व्हर्जिन या कादंबरीत कौमार्यभंग ही संकल्पना पुरुषाच्या संदर्भात योजून अतिशय कल्पकतेने कादंबरीचा आलेख उंचावला आहे, असे प्रतिपादन कवी अशोक बागवे यांनी डिंपल पब्लिकेशनतर्फे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या “गांजले ते गाजले’ आणि दशवतारावर पाहिले संशोधन केलेले डॉ. अशोक भाईडकर यांच्या “व्हर्जिन’ या मराठी आणि इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन समारंभात बोलताना केले. वसईतील डिंपल प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला गांजले तर गाजले आणि व्हर्जिन या दोन मराठी आणि इंग्रजी कांदबरीचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना कवी अशोक बागवे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत इंग्रजाळलेल्या मराठी भाषेचा चांगलाच समाचार घेतला. वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, प्रदीप कबरे, डॉ. सुनिता चव्हाण, प्रमोद पवार, व्यंकटेश नायडू, अशोक मुळे यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये उच्च श्रेणीचे मराठी अभ्यासक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे हवे, असे मत राजीव पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. सुनीता चव्हाण यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने व्हर्जिन कादंबरीचे विशलेषण केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ . गिरीश ओक , प्रमोद पवार , प्रदीप कबरे , अभिनेत्री डॉ . श्वेता पेंडसे यांनी गंगाराम गवाणकर यांच्या ” गांजले ते गाजले ” पुस्तकातील उतार्‍यांचे अभिवाचन करून कार्यक्रमात बहार आणली. प्रेक्षकांमध्ये बोलक्या बाहुल्याचे जनक रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये,गंधाली दिवाळी अंकाचे मधुकर वर्तक,लेखिका नेहा सावंत,डॉ.नंदा मेश्राम. मनीषा रावराणे, चित्रकार अनिल दाभाडे, त्यांत्या पत्नी, अभिनेते अरुण होर्णेकर, संभाजी कदम, दत्तात्रेय देशमुख, सुरेश ठाकूर, केवल वर्तक, वंदना वर्तक,सुनील आचोलकर, नरेश बंटवाल, मकरंद सावे,रवी देशमुख, सुनील लांजेकर, अजिंक्य चौलकर,सदा चव्हाण, हेमंत मेस्त्री,प्रदीप तळेकर, कौतुक मुळे आणि नम्रता मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -