घरपालघरVasai Rikshaw:रिक्षाच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संघटना आक्रमक

Vasai Rikshaw:रिक्षाच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संघटना आक्रमक

Subscribe

मात्र करोनाकाळ उलटून चार वर्षे झाली असतानाही दोनऐवजी चार ते पाच प्रवासी नेले जात आहेत आणि भाडे दुप्पटच ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

वसई: वसई-विरारमधील रिक्षाचालकांतर्फे बेकायदा करण्यात आलेली भाडेवाढ आरटीओने सांगूनही रद्द न केल्याने वसई-विरारमधील प्रवासी संघटनांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.करोनाकाळात झालेली अनधिकृत भाडेवाढ अजूनही कायम असून त्यात आता बेकायदा प्रवासी वाहतूक वाढली आहे. करोनाकाळात सुरक्षित प्रवासासाठी पालघर जिल्हाधिकार्‍यांनी केवळ दोन प्रवासी एकावेळी घेण्याचे आदेश दिले होते. वसई-विरारमध्ये अजूनही रिक्षाचे भाडे हे मीटरवर नसून प्रति प्रवासी भाडे आकारण्यात येते. सुरक्षित प्रवासासाठी चारऐवजी दोन प्रवाशांना नेले जाऊ लागल्याने रिक्षाचालकांचे नुकसान होऊ नये, यासाठी एका प्रवाशासाठी करोनाकाळात दुप्पट भाडे आकारण्यात येत होते. मात्र करोनाकाळ उलटून चार वर्षे झाली असतानाही दोनऐवजी चार ते पाच प्रवासी नेले जात आहेत आणि भाडे दुप्पटच ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

अनेकदा मागणी करूनही रिक्षाचालकांनी भाडे कमी केले नसल्याने ‘आम्ही वसई विरारकर प्रवासी संघटना’, ‘वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना’ आणि ‘आमची पश्चिम रेल्वे – वसई विरार’ या तीनही संघटनांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील चार वर्षांपासून मतदारांचे प्रश्न सुटत नसतील किंवा त्यांची आर्थिक पिळवणूकच होणार असेल तर मतदान का करायचे? सर्वसामान्य १० ते १२ हजारांवर काम करणार्‍या वसई-विरारकरांनी रोज रिक्षासाठी ४० रुपये आणायचे कोठून? पाणी, रुग्णालय, रस्ता अशा विविध समस्या असताना यावर कोणीही बोलताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आम्ही वसई- विरार प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -