उपवासामुळे शरीर व मन दोन्ही शुद्ध होतात. सतत कार्यरत असणार्या पचनेंद्रियांना विश्रांती मिळते. शरीरात साठलेली अतिरिक्तन चरबी, प्रोटिन्स, शर्करा यांचा वापर होऊन आपल्या जीवनक्रिया उपवास काळात चालू राहतात. यातूनच शरीरात साठलेले विजातीय पदार्थ बाहेर टाकले जातात आणि रोगनिर्मूलन होते.