- Advertisement -
जम्मू-काश्मीर जेवढं सुंदर निसर्गाने नटलेलं आहे, तेवढंच दहशतवादाच्या समस्येनेही वेढलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या भूमीत दहशतवाद धगधगतोय. हा दहशतवाद नेमका घालवायचा तरी कसा? आणखी किती दिवस सैनिक आणि निष्पाप नागरिकांचे बळी पडणार? असे अनेक प्रश्न सामान्य भारतीय नागरिकाला पडलेले असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी यावर समर्पक असे उत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरचा दहशतवाद संपवण्यासाठी बिगर लष्करी प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हदरम्यान व्यक्त केले.
- Advertisement -