आज आमलकी एकादशीनिमीत्त पंढरपुरीतील विठ्ठल-रक्मिणी मंदीरात विविध प्रकाराची १ टन फुले आणी १०० किलो द्राक्षांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकलेली फळे आणि फुले विठूरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी येत असतात. प्रत्येक सण आणि उत्सवानिमित्ताने मंदीराच्या गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुले आणि त्या हंगामातअसलेली फळे यांचा वापर करुन सजावट केली जाते. वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी तयार केलेले जय हरी राम कृष्ण हरी पाहून मन प्रसन्न होत आहे.