महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून मलिकांवरील ईडीची कारवाई कायद्यानुसार असल्याचे म्हटले जातेय. तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी ही कारवाई राजकीय नेत्यांना केंद्राच्या दबावाखाली ठेवण्यासाठी केल्याचे म्हटले जातेय. एकूणच नबाव मलिका यांची चौकशी, अटक आणि ईडी कोठडीपर्यंतचा घटनाक्रम काय होता जाणून घेऊ… (फोटो – दिपक साळवी)