घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha 2024: राज ठाकरेंवर हल्ला करण्याचा प्लॅन, तुमचीच लोक...; मनसे नेत्याचा...

Lok Sabha 2024: राज ठाकरेंवर हल्ला करण्याचा प्लॅन, तुमचीच लोक…; मनसे नेत्याचा दावा

Subscribe

संदीप देशपांडे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. अडीच वर्षांत मंत्रालयात 2 वेळाच गेले, वर्षा बंगल्यावरही मुख्यमंत्री भेटत नव्हते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या समस्या घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला जायचे.

रत्नागिरी: कोकणात प्रचार करु नका. या निवडणुकीच्या माध्यमातून एक फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. तुमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन आहे. तुमच्याच जवळचा माणूस हल्ला करुन त्यात नारायण राणेंचं नाव घालणार असल्याची माहिती पोलिसांनी राज ठाकरेंना दिली होती, असा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. रत्नागिरी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.(Lok Sabha Election 2024 Plan to attack Raj Thackeray MNS leader Sandeep Deshpande claim)

नेमकं काय म्हणाले देशपांडे ?

संदीप देशपांडे म्हणाले की, नारायण राणेंनी शिवसेनेत बंड केलं, तेव्हा इथं निवडणूक लागली. तेव्हा आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत होतो. राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात आम्ही इथं प्रचाराला आलो होतो. सगळीकडे प्रचार सुरू होता. मुंबईतले अनेक शिवसैनिक इथे येत होते. त्यावेळी इथले पोलीस अधीक्षक होते, के प्रसन्न, ते राज ठाकरेंना भेटले. तुम्ही कोकणात थांबू नका, कोकणात प्रचार करू नका, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

तेव्हा असं काय घडलंय हा प्रश्न राज ठाकरेंनी पोलीस अधीक्षकांना विचारला, तेव्हा या निवडणुकीच्या माध्यमातून एक फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. तुमच्यावर एक प्राणघातक योजना आखल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली आहे आणि हा हल्ला तुमच्याच लोकांकडून होणार असून त्यात नारायण राणेंचं नाव घातलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी राज ठाकरेंना दिली. आता हे करणारा माणूस कोण हे नाव सांगायची गरज नाही. ते जनतेला आपोआप कळेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

कोणाचा बापही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही

संदीप देशपांडे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. अडीच वर्षांत मंत्रालयात 2 वेळाच गेले, वर्षा बंगल्यावरही मुख्यमंत्री भेटत नव्हते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या समस्या घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला जायचे. महाराष्ट्रात जोपर्यंत मनसे आणि राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कोणाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची हिंमत नाही. मराठी कार्ड वापरून मराठी माणूस धोक्यात आहे, असं सांगून मते मागायची. पण उद्धव ठाकरे तुम्ही म्हणजे मराठी नाही. तुम्ही आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही धनुष्यबाणही नाही, तुम्ही शिवसेनाही नाही. हे सत्य आणि वास्तव आहे. आज महायुतीसोबत मनसे खंबीरपणे उभी आहे. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासठी, युवकांसाठी बिनशर्त पाठिंबा द्यायचं काम राज ठाकरेंनी केलं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha : उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचं असेल तर…; संजय राऊत असं का म्हणाले?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -