भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि कर्णधारपदावरून चिघळलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. विराटने म्हंटले की, त्याला निवडकर्त्यांच्या मिटींग दरम्यानच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबतची चर्चा झाली होती. कोहलीच्या या विधानावरून आता मोठा वाद चिघळला आहे. बीसीसीआय आणि कोहली मधील मतभेद उघडकीस आले आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी म्हंटले की, “संघ निवड समितीने कर्णधारपदाबाबत अधिकृत घोषणा करण्याच्या अगोदर विराटला याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे यावर कोणताही वाद झाला नाही पाहिजे. जर विराटला माध्यमांच्या माध्यमातून हे कळत असेल तर ही एक धक्कादायक बाब आहे.”
दरम्यान, भारतीय संघ गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सुनिल गावस्कर यांनी म्हंटले की, खेळाडूंनी या सर्व वादापासून दूर राहिले पाहिजे आणि या सर्व घडामोडींचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर काहीच होणार नाही. “कोणत्याही बातमीच्या अगोदर सूत्रांपेक्षा खेळाडूंकडून त्या बाबतची माहिती पक्की केली पाहिजे. गावस्करांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दोन खेळाडूंमध्ये कर्णधार पदावरून प्रश्व उपस्थित केले जातात, तेव्हा माध्यमं दोन्ही खेळाडूंमधील वादाच्या घडामोडी सतत चालवत असतात.
सुनिल गावस्करांनी हे देखील म्हंटले की विराट कोहलीच्या असा विधानानंतर बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलींची जबाबदारी आहे की या बाबतीत मोकळेपणाने आपली बाजू मांडणे. दरम्यान, पत्रकार परिषदेत विराट कोहलीने म्हंटले की, त्याला कर्णधारपादवरून हटवण्याच्या दीड तास अगोदर निवड समितीने सांगितले की त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले जात आहे.