घरठाणेकळवा-मुंब्रा रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरु करा, अन्यथा... जितेंद्र आव्हाडांचा इशारा

कळवा-मुंब्रा रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरु करा, अन्यथा… जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Subscribe

एमआरव्हीसी मार्फत उभारण्यात येणाऱ्या कळवा-मुंब्रा रेल्वे पादचारी पुलाचे काम गेली पाच वर्षे बंदच असल्याने राज्याचे गृहमंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी ट्वीट करत रेल्वे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे. त्वरीत पादचारी पुलाचे काम सुरु करा, अन्यथा, पुढील ८ दिवसात आम्हाला रेल्वे बंद करु असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे; ती बेजबाबदारपणाची आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच ५० जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जर त्वरीत रेतीबंदर पादचारी पुलाचे काम सुरु केले नाही, तर, पाचव्या- सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही, असा इशाराही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

या पादचारी पुलाचे भूमिपुजन झाल्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरु होत नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. त्या विरोधात डॉ. आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपुजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात जे ५० जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल. त्यामुळे त्वरीत पादचारी पुलाचे काम सुरु करावे; अन्यथा, पुढील ८ दिवसात आम्हाला रेल्वे बंद करावी लागेल. अतिशय उग्र आंदोलन रेल्वेच्या विरोधात होईल. एवढेच नाही तर रेल्वेने जे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु केले आहे. ते कामही आम्ही होऊ देणार नाही, असंही आव्हाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केला असल्याचा खुलासा केला आहे. याबाबत विचारले असता, रेल्वेकडून शंभर टक्के खोटे बोलले जात आहे. अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही; त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ठामपणे म्हणत आहोत की रेतीबंदर परिसरात जे ५० लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत. त्यास मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे. ठामपाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरु आहे का?, असा सवालही डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.


जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे ‘दात घशात गेले’, आशिष शेलारांची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -