- Advertisement -
दरवर्षी मे आणि जून महिना आला की मुंबईत पाणी कपात केली जाते. मात्र या पाणी कपातीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प मनोर येथे उभारण्यात येणार असून समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करण्यात येणार आहे. मनोरमध्ये २५ ते ३० एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून भविष्यात या प्रकल्पाची क्षमता वाढवू शकतो.
- Advertisement -