- Advertisement -
राज्यामध्ये अराजकता पसरत चालली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या चौकशीसाठी नऊ-दहा तास त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवं जातयं. यासह आमदारांना अटकपूर्व जामिनाचं प्रोटेक्शन असतानाही डांबून ठेवलं जातंय, तक्रारदार म्हणून पोलिसांकडे जाणाऱ्या किरीट सोमय्या, करूणा शर्मा यांच्यावरच केस केली जातेय. अमरावतीमध्ये शाईफेक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता, मग विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार?; असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. यासह विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलंय.
- Advertisement -