देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. विशेष म्हणजे कोरोना मृतांच्या संख्येत आज कमालीची घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 4 हजार 362 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 9,620 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या देशात 54,118 इतकी झाली आहे.
COVID19 | India logs 4,362 new cases & 66 deaths in the last 24 hours; Active cases stand at 54,118 pic.twitter.com/K0DfPjZU6C
— ANI (@ANI) March 7, 2022
देशात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या आज 4,23,98,095 झाली आहे. तर देशातील कोरोना मृतांची संख्या 51,5036 झाली आहे. देशात आजपर्यंत कोरोनामुळे 54118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरचं मृतांची संख्या 100 च्या आत आली आहे, यामुळे कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.71 टक्के आहे. तर आत्तापर्यंत आतापर्यंत 77.34 कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 6,12,926 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. राज्यात रविवारी 362 बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. 688 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 17 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 98.08 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या 26 हजार 291 व्यक्ती या होम क्वारंटाईन असून 587 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या 3 हजार 709 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.