- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील पत्राचाळ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना आपलं हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, असं आवाहन केलं. या घरांसाठी अनेकांनी आंदोलन केलं. यातील काही जण तर आता आजचा क्षण बघायला हयात देखील नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
- Advertisement -