- Advertisement -
महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, आजदेखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य बाहेर गेलेल्या प्रोजेक्टसंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांना देखील अनेक सवाल उपस्थित केले. अशा घडामोडींवर प्रत्युत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ‘आम्ही नवनवीन प्रोजेक्ट राज्यामध्ये आणत आहोत, ठाकरे गटाला खोटं सांगू द्या, लोकांना खरं दिसेल,’ असं वक्तव्य केले.
- Advertisement -