- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. २५ हजार रुपये मदत देणार अशी घोषणा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी फक्त राजकीय भाषण केलं. एकाही आमदारांच्या प्रश्नावर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही असा आरोप भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी केला आहे. हजार रुपये मुदतवाढीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. शेतकरी अडचणीत असताना सरकार त्यांना काहीच देणार नसेल तर हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप केला
- Advertisement -