- Advertisement -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून समन्वय समिती राज्य शासनाशी समन्वय साधून पत्रव्यवहार करत असून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. राज्य शासनाने आज गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या नवीन मार्गर्शक सूचनांमुळे मूर्तिकार आणि मंडळात असंतोष निर्माण झाला आहे. आमची मागणी आम्ही शासनाकडे मांडली होती. मात्र शासनाने एकतर्फी निर्णय घेतला हा निर्णय उचित नसून याचा फेरविचार शासनाने करायला हवा अशी विनंती मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.
- Advertisement -