- Advertisement -
चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर ते एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणारा हा पूल आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी त्याची काही कामे सुरू झाली होती. परंतु मागील पाच वर्षात या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने झाले. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर या पुलाचे पूर्ण काम झाले होते, मात्र त्याचे उद्घाटन झाले नसल्याने आमदार नवाब मलिक यांनी या पुलामुळे स्थानिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास होत असल्याने आपण याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत प्रशासनाने हा उड्डाणपुल येत्या आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुकारलेल्या पहिल्याच आंदोलनाला यश मिळाले आहे.
- Advertisement -